शहरं
Join us  
Trending Stories
1
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
2
"लाडली, लक्ष्मी, बहीण..."; निवडणूक वर्षात महिलांसाठी रोख रकमेचा महापूर; सरकारं घाट्यात! आरबीआयनं दिलाय मोठा इशारा 
3
मिर्झापूरजवळ भीषण अपघात; रेल्वे रुळ ओलांडताना 'कालका मेल'खाली चिरडून ६ भाविकांचा मृत्यू
4
Sonam Raghuvanshi : ना कागद, ना कापड... राजा रघुवंशीच्या हत्येनंतर धूर्त सोनमने कसे पुसले हत्यारावरचे रक्ताचे डाग?
5
SBI ची नोकरी सोडून सुरू केली शेती, आज ७ कोटींच्या हेलिकॉप्टरचा मालक! ५ एकरापासून सुरुवात
6
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
7
"तुम्हाला अपेक्षित असलेलं उत्तर मिळू शकत नाही"; मतदार याद्यांच्या वादावरून CM फडणवीसांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर
8
काँग्रेससाठी टीव्ही डिबेट करणारी भाव्या निघाली लष्करी अधिकारी; 'डबल रोल' करणारी कोण आहे ही...
9
मानव-बिबट्या संघर्षावर सरकारचे निर्णायक पाऊल; मनुष्यहानी रोखायला प्राधान्य, ११ कोटी मंजूर
10
'संबंध ठेवण्यापूर्वी कुंडली जुळवायची होती!'; पोलिस अधिकाऱ्यांच्या हायप्रोफाईल प्रकरणावर सुप्रीम कोर्टाची उपरोधिक टिप्पणी
11
"होनराव म्हणजे तू मराठी ना? तुझी बायको भैयिणी...", कमेंट वाचून मराठी अभिनेत्याचा संताप, म्हणाला...
12
जगातील टेक उद्योगात उलथापालथ: ॲमेझॉन, गूगल नंतर आता 'या' कंपनीच्या हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
13
"माझ्यापेक्षा मोठा गुंड नाही"; भाजपाच्या आजी-माजी खासदारांमध्येच जुंपली, एकमेकांना भिडले अन्...
14
Zohrab Mamdani: न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
15
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
16
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीमध्ये समन्वय साधून अंतिम निर्णय”: सुनील तटकरे
17
Vijay Mallya : 'जप्त केलेल्या मालमत्ता आणि थकीत कर्जाची माहिती द्या,' विजय माल्ल्यानं न्यायालयात काय म्हटलं?
18
Astrology: नशिबात नसलेल्या गोष्टीही स्वामीकृपेने मिळवता येतात का? ज्योतिष शास्त्र काय सांगते? पाहू
19
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?

कर्जमाफीवरून अधिवेशन बंद पाडू : हसन मुश्रीफ यांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 01:11 IST

कोल्हापूर : शेतकरी कर्जमाफीच्या आतापर्यंत जाहीर झालेल्या आकडेवारीत कोल्हापूरसह पश्चिम महाराष्टÑातील ऊसकरी शेतकºयाला लाभ मिळालेला नाही,

ठळक मुद्देप्रतापसिंह चव्हाण यांच्या कामाने जिल्हा बँकेला पुनर्वैभव बँकेला सुस्थितीत आणण्यासाठी त्यांनी अनेकवेळा कठोर निर्णय

कोल्हापूर : शेतकरी कर्जमाफीच्या आतापर्यंत जाहीर झालेल्या आकडेवारीत कोल्हापूरसह पश्चिम महाराष्टÑातील ऊसकरी शेतकºयाला लाभ मिळालेला नाही, यासाठी शासन नियमांत बदल करण्याची गरज आहे. ते न झाल्यास दि. ११ डिसेंबरपासून सुरू होणारे हिवाळी अधिवेशन चालू देणार नाही, असा इशारा कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी येथे पत्रकार परिषदेत दिला.शाहूपुरीतील जिल्हा बँकेच्या प्रधान कार्यालयात संचालक मंडळाच्या बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतापसिंह चव्हाण यांच्या निरोप समारंभाचे आयोजन केले होते. या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी संचालक पी. एन. पाटील, निवेदिता माने, भैया माने, सर्जेराव पाटील-पेरिडकर, आर. के. पोवार, उदयानी साळुंखे, अशोक चराटी, राजेंद्र पाटील-यड्रावकर, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर आदी प्रमुख उपस्थित होते.मुश्रीफ म्हणाले, शेतकरी कर्जमाफीसाठी सरकारने दि. १ एप्रिल ते ३१ मार्चपर्यंत कर्ज भरणारे शेतकरी समाविष्ट केले आहेत; परंतु ऊसकरी शेतकरी हे १ आॅक्टोबर ते ३० सप्टेंबर या कालावधीत कर्ज भरतात. त्यामुळे त्यांंना कर्जमाफीचा लाभ होवू शकत नाही. त्यासाठी सरकारला नियम बदलावे लागतील, अधिवेशन सुरू होईपर्यंत यासाठी वाट पाहू, अन्यथा ११ डिसेंबरपासून सुरू होणारे विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू होऊ देणार नाही.बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतापसिंह चव्हाण यांनी चांगले काम करून बँकेला पुनर्वैभव प्राप्त करून दिल्याचे गौरवोदगार मुश्रीफ यांनी काढले. बँकेला सुस्थितीत आणण्यासाठी त्यांनी अनेकवेळा कठोर निर्णय घेतले. त्यांच्या या शिस्तबद्ध कार्यप्रणालीमुळे त्यांनी मार्चपर्यंत थांबून बँकेच्या ठेवी ६००० कोटींपर्यंत न्याव्यात, कर्मचाºयांचा बोनस यासह विविध विषय हाती घेऊन बॅँकेच्या वैभवात आणखी भर पाडावी अशी इच्छा होती, परंतु त्यांना सांगली जिल्हा बँकेकडे जाणे क्रमप्राप्त आहे, तरीही त्यांनी या बँकेकडे लक्ष द्यावे.बँक अडचणीतून बाहेर : प्रतापसिंह चव्हाणप्रतापसिंह चव्हाण म्हणाले, जिल्हा बँकेसाठी आपल्याला शक्य होते तितके योगदान देऊन ती पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न केले. एप्रिल २०१२ मध्ये बँकेच्या प्रशासकपदाची धुरा हाती घेतल्यानंतर असणारे उणे नेटवर्थ, उणे सी.आर.ए.आर., निधीची चणचण, एनपीएचे प्रमाण, संचित तोटा अशा बाबींवर मात करत सर्व संचालकांसह कर्मचाºयांच्या सहकाºयाने मार्च २०१७ चा ताळेबंद आपण रिझर्व्ह बँकेला अपेक्षित असलेल्या निकषांप्रमाणे काढू शकलो. त्याचबरोबर बँकेस सीआरएआर १०.७ ठेवून जिल्हा बँकेचा रिझर्व्ह बँकेकडून असणारा परवाना अबाधित ठेवू शकलो याबाबत समाधानी आहे.सीईओपदी शिवाजी वाघ यांच्या नावाचा ठरावबॅँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतापसिंह चव्हाण हे सांगली जिल्हा बॅँकेत रुजू होणार आहेत. त्यामुळे त्यांच्या जागेवर महाराष्ट्र राज्य सहकारी बॅँकेचे सरव्यवस्थापक शिवाजी ठकराम वाघ यांची नियुक्ती व्हावी, असा ठराव संचालक मंडळाच्या बैठकीत करण्यात आला आहे. त्यानुसार पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडेही तशी मागणी करण्यात येणार असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.